Saturday, September 3, 2022

नांदगाव शहराचा पाणीपुरवठा ५ दिवसाआड, शुद्ध करण्याची मागणी,


नांदगाव (प्रतिनिधी)- नांदगाव शहरात पाण्याचा पुरवठा तब्बल १० ते १५ दिवसानंतर होत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय  होत आहे . ईतका लांबणारा पाणी पुरवठा ५ दिवसाआड व शुद्ध स्वरूपात करावा अशी मागणी पत्राव्दारे शिवसेनेचे संतोष गुप्ता यांनी नगरपरिषदला केेेेली आहे.  शहराचा पाणीपुरवठा ऐन उन्हाळ्यात आपल्याच काळात पाच दिवसाआड व शुद्ध स्वरूपात होत होता. नागरिकांना पाणी पुरवठा अशूद्व स्वरूपाचा होत असून ,  सणासुदीच्या दिवसांत पाणी पुरवठा करण्याची विनंती नांगरिक करत आहे.  पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. या मागणीसाठी प्रत नांदगाव तहसिलदार व पोलीस निरीक्षकांना देण्यात आलेली आहे.

No comments:

Post a Comment

न्यू इंग्लिश विद्यालयात 'जागतिक महिला दिन' उत्साहात साजरा,

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल  मध्ये 'जागतिक महिला दिन' मोठ्या उत्साहात...