Saturday, September 3, 2022

नांदगाव शहराचा पाणीपुरवठा ५ दिवसाआड, शुद्ध करण्याची मागणी,


नांदगाव (प्रतिनिधी)- नांदगाव शहरात पाण्याचा पुरवठा तब्बल १० ते १५ दिवसानंतर होत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय  होत आहे . ईतका लांबणारा पाणी पुरवठा ५ दिवसाआड व शुद्ध स्वरूपात करावा अशी मागणी पत्राव्दारे शिवसेनेचे संतोष गुप्ता यांनी नगरपरिषदला केेेेली आहे.  शहराचा पाणीपुरवठा ऐन उन्हाळ्यात आपल्याच काळात पाच दिवसाआड व शुद्ध स्वरूपात होत होता. नागरिकांना पाणी पुरवठा अशूद्व स्वरूपाचा होत असून ,  सणासुदीच्या दिवसांत पाणी पुरवठा करण्याची विनंती नांगरिक करत आहे.  पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. या मागणीसाठी प्रत नांदगाव तहसिलदार व पोलीस निरीक्षकांना देण्यात आलेली आहे.

No comments:

Post a Comment

नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...