नांदगाव( प्रतिनिधी ) : - लव्ह जिहाद,धर्मांतर गोवंश हत्याबंदी यासंदर्भात कायदा करण्यात यावा या मागणीसाठी नांदगाव येथे हिंदुत्ववादी संघटनांतर्फे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. येथील मनमाड चौफुली येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली शहरातील विविध मार्गावरून हा मोर्चा हुतात्मा स्मारक येथे आणण्यात आला यावेळी जोरदार घोषणाबाजी करत लवकरात लवकर या कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी महिला पुरुष यांच्यासह सकल हिंदू समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सध्या देशात व राज्यात लव्ह जिहाद प्रकरण मोठ्या प्रमाणात घडत असुन अनेक हिंदू मुलींना फूस लावून त्यांचे धर्मांतर करण्यात येत आहे यासह गोवंश हत्याबंदी धर्मांतर बंदी कायदा करण्यात यावा यासाठी हिंदू संघटना आक्रमक झाल्या असुन राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात येत आहे. आज नांदगाव येथे देखील सकल हिंदू समाजातर्फे भव्य मोर्चा काढण्यात आला होता.येथील मनमाड चौफुली वरील अहिंसा चौक येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली शहरातील शनी मंदिर,मोठी होळी,छत्रपती शिवाजी महाराज चौक,कासार गल्ली फुले चौक डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे हुतात्मा चौकात मोर्चाचे सभेत रूपांतर करण्यात आले यावेळी दत्तराज छाजेड,संगिता सोनवणे,सागर फाटे, विकास शार्मा. सुमित गुप्ता संजय सानप डॉ आंनद पारख डॉ श्रीकांत देवरे सचिन पवार .महेश पैठणकर आदींनी भाषण करत लव जिहाद बद्दल कठोर कायदा करण्याची मागणी केली.यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणुन मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.