बाणगांव ( प्रतिनिधी) - शाळेतील मस्ती,एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक,शाळेतील क्रीडा स्पर्धा,शिक्षकांनी दिलेली शिक्षा,स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी -शिक्षकांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो हे विसरून गेले होते.निमित्त होते बाणगाव येथील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या जनता विद्यालयात च्या इयत्ता १० वीच्या माजी विद्यार्थ्यांच्या गेट टूगेदर मेळाव्याचे.१९९९ नंतर जवळपास २३ वर्षनी शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळावा गुरुवारी (ता.२७)ला राधाकृष्ण लॉन्स ला आयोजित करण्यात आला होता.
१९९९ साली जनता विद्यालयचे वर्ग श्री बाणेश्वर मंदिर परिसरातील इमारतीत भरत असे तिथे पूर्वीच्या स्कुलच्या परिसरात सकाळी ९ वाजता शाळेतील माजी विद्यार्थी,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बाणेशर मंदिरात एकत्र आले तिथे फेटे बांधून ग्रुप फोटो काढत कार्यक्रमस्थळी राधाकृष्ण लॉन्स येथे गेले कार्यक्रमात ची सुरुवातीला प्रमुख अतिथीनी सरस्वती देवीच्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले ल या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोकुळ चव्हाण होते.यावेळी प्राथमिक शाळेचे माजी शिक्षक उत्तम आहेर जनता विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक पी.एस.काळे,शिक्षक शरद आहेर,शिक्षिका श्रीमती प्रतिभा मापारी- कदम,जनार्दन शिक्षकेत्तर कर्मचारी लासुरे आदी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या वेळी १९९९ बॅचला शिकवणारे शिक्षकांचा शाल श्रीफळ देऊन गुरुजनांचा सन्मान विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आला.
यावेळी सध्या हायत नसलेल्या मृत्यु पावलेल्या माजी विद्यार्थी मित्रांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी यावेळी माजी विद्यार्थ्यांचा सत्कार गुरुजनांच्या वतीने गुलाबाचे फुल देऊन करण्यात आला गेट टू गेदर कार्यक्रमात आलेल्या सर्व माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वानी आपला अल्प परिचय करून दिल्यावर .यावेळी माजी विद्यार्थी चिंतामण साबळे,गणेश देवकर,बाबासाहेब कदम,उषा कवडे,चित्रा गोराडे,ईश्वरी काकळीज यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये त्यांनी जुन्या आठवणीला उजाळा देताना शिक्षकांच्या तासाला घडलेल्या प्रसंग,छडी,उठ बस्या,करण्याची शिक्षा,जादा तास,क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम,शैक्षणिक सहल याची आठवण करून दिली काही गमतीदार आणि काही चांगल्या आठवणींना उजाळा दिला.अनेक विद्यार्थी.वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असताना जीवनात यश मिळवले असले तरी त्यामागे शाळेचे संस्कार आहेत, अशी भावना अनेक माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. १९९९ च्या दहावी बँचचे विद्यार्थी- विद्यार्थ्यांनी व्हाट्सएप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आले यामध्ये प्रामुख्याने उषा कवडे,गणेश देवकर, चिंतामण साबळे आणि सहकारी यांचे योगदानामुळे " क्लासमेंट " या ग्रुपच्या माध्यमातून जोडली गेली आहे व या पुढेही अशीच जोडलेली राहणार आहे,यावेळी माजी शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले मनोगत व्यक्त करताना म्हणाले माजी विध्यार्थी, शिक्षक यांचे स्नेहसंमेलन घेण्यात आले याबद्दल या बेचस च्या विद्यार्थ्यांचे कोतुक केले या स्नेहसंमेलनामुळे सर्व विद्यार्थी मित्र मैत्रीण,शिक्षक वर्ग यांच्या भेटी झाल्या हा क्षण वेगळाच असतो सर्व माजी विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या,तब्बल २३ वर्षोनी आपल्या शाळेत येत आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देता आले सर्वना एकत्र येत सवांद साधला आला वयाची जवळ जवळ चाळिसाव्या वर्षी ओलंडलेल्या माजी विघार्थ्यामध्ये यामुळे उत्साहाचे चैतन्य निर्माण झालले पाहवयास मिळाले.जिल्हा परिषदेच्या केंद्र प्राथमिक शाळेच्या व जनता विद्यालय.या शाळेत शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी आज राजकारण,उद्योग,शिक्षण,सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात काम करीत असून त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे.यानंतर सर्व शिक्षक माजी विद्यार्थ्यांच्या साठी भोजनाची मेजवानी देण्यात आली . यावेळी माजी विद्यार्थी,गणेश देवकर,दिलीप खालकर,चिंतामण साबळे,संभाजी काजळे,शरद कवडे,त्रिनाथ पवार,मच्छिंद्र कवडे, संदीप गोराडे,बाबासाहेब कदम,बाजीराव सोनवणे,विजय रोठे विजय काळे,बाळासाहेब काकळीज,संदीप गोराडे,राहुल कदम,नंदु फणसे, गणेश बनगर,सोमनाथ भामरे,सुनील आहेर,संतोष बागुल,रामहरी ,निकम,संजय साबळे,उषा कवडे,चित्रा गोराडे,सुनीता गोराडे, सुवर्णा गोराडे,वैशाली कवडे,ईश्वरी काकळीज,निता जाधव,पदमा काकळीज,संगीता साबळे,मनिषा निकम कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन,आभार, उषा कवडे,बाबासाहेब कदम यांनी केले .