नांदगाव (प्रतिनिधी ) नांदगाव शहरातील आनंदनगर भागातील गाळ मिश्रित पाणी पुरवठा झाल्याने संतप्त महिलांनी एकत्र येऊन नांदगाव- संभाजीनगर रोडवर रास्ता रोको केला होता. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात संतप्त महिलांनी गढूळ पाण्याची बाटली डोक्यावर घेऊन मोठ्या संख्येने नांदगाव नगरपरिषद कार्यालयावर मोर्चा काढला आहे.
सकाळी वेळेस आनंदनगर भागात गाळ मिश्रित पाणी पुरवठा झाल्याने संतप्त महिलांनी नांदगाव- संभाजीनगर रोडवर सकाळी ८:३० रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांच्या मध्यस्थीने रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.ढोल ताशांच्या गजरात आनंदनगर येथून मोर्चाला सुरुवात होऊन शहरातील प्रमुख मार्गाने संतप्त महिलांनी गढूळ पाण्याची बाटली डोक्यावर घेऊन शेकडोच्या संख्येने नांदगाव कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी मुख्यधिकारी तथा प्रशासक विवेक धांडे यांनी बोलताना सांगितले की, जिल्हा परिषदेच्या पाईपलाईनचे काम करण्यात आले होते.त्यामुळे गढूळ पाणी आले आहे. आपल्याला स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात येईल. लवकरच नांदगाव शहरासाठी जलशुद्धीकरण केद्र उभारण्यात येणार आहे. तसेच शहरासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भ्रमणध्वनी देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी सांगितले.या मोर्चा मध्ये माजी नगरसेवक अरुण साळवे, अनिल जाधव,विश्वास अहिरे, नितीन जाधव, अँड सचिन साळवे, मनोज चोपडे, दिपक अंभोरे,गणेश अहिरे, तानसेन जगताप,अविनाश केदारे, सचिन पगारे, अँड विद्या कसबे, शोभा पगारे,कमल अहिरे,कुसूम जगताप,तारा चोपडे, आक्का सोनवणेसह शेकडो महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.