नांदगाव ( प्रतिनिधी )- गारपीट वादळ वाऱ्या पावसामध्ये संसाराची नास धुस होऊन रस्त्यावर आलेल्या कुटुंबाला तात्काळ पत्रे अन्नधान्य कपडे देऊन खऱ्या अर्थाने कुटुंबप्रमुखाची जबाबदारी आमदार सुहास आण्णा कांदे यांनी पार पाडली. ८०% समाजकारण हे धोरण ठेऊन आण्णा निरंतर गरजवंतांच्या मदतीला धावून येताना मतदारसंघ पाहत आहे. आज पुन्हा याचा प्रत्यय आला. धोटाने खुर्द ( जोंधळवाडी) येथील सरूबाई भिवसन पिंपळे या मोठी मुलगी संगीता बाई , कौतिक गांगुर्डे सह राहतात. मुलगा व सून ऊस तोडीला गेले आहेत. रात्री अचानक वादळासह पाऊस आला आणि यात घराचे पत्रे उडाले भिंती पडल्या. कशीबशी त्यांनी रात्र काढली, व त्याचे नव्हते झाले. मोठ्या प्रमाणात गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती मिळताच आमदार सुहास अण्णा कांदे आणि सकाळी सर्व शासकीय अधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त भागाकडे धाव घेतली. सरुबाई भीमसेन पिंपळे यांच्या घरी भेट दिल्यावर सर्व उध्वस्त झालेल्या घराची परिस्थिती पाहून आण्णा भावूक झाल्याचे दिसले. तात्काळ स्वखर्चातून घराचे पत्रे धान्य किराणा आणि कपडे पोहोच करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या.
या सर्व लोकांना ५० किलो गहू ,५० किलो तांदूळ, तेल साखर सह सर्व किराणा, पत्रे अँगल धान्य व चार साड्या अशी मदत घरी जाऊन त्यांना सुपूर्द करण्यात आली.
गारपिटीची माहिती मिळताच आमदार सुहास आण्णा कांदे यांनी तत्काळ शासकीय यंत्रणा कामाला लावली. स्वतः सकाळी नुकसानग्रस्त भागात जाऊन शेतकरी बांधवांची व कुटुंबीयांची भेट घेतली. परिस्थितीचे गांभीर्य समजून घेत त्यांना धीर दिला. या गारपीटीत मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांच्या शेतमालाचे नुकसान झाले. सर्व परिस्थिती पाहता तात्काळ मुख्यमंत्री महोदयांची बोलून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन शेतकरी बांधवांना दिले. या प्रसंगी प्रतिनिधी भाऊराव बागुल, शिवसेना तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, राजाभाऊ पवार , राजाभाऊ देशमुख, अंकुश तात्या कातकडे ,योगेश पाटील, किशोर लहाने, अनिल तात्या रिंडे, रफिक भाई पठाण , बापूसाहेब जाधव राजेभाऊ सांगळे , दत्तू आबा पवार, संतोष सांगळे, भाऊसाहेब पवार, दतू काळे, अनिल काळे, रोहिदास पिंपळे, सुरेश काळे, आप्पा गुंडगळ, आदी उपस्थित होते.