नांदगाव (प्रतिनिधी ) - मल्हारवाडी नांदगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सारिका संदीप जेजुरकर यांची बिनविरोध निवड झाली.
आवर्तन पद्धतीने ठरल्यानुसार सुनंदा बळीराम झेंडे यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत सदस्य यांची विशेष सभा बोलविण्यात आली होती. या सभेत सरपंचपदासाठी सारिका जेजुरकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व्ही. के. ढवळे यांनी सारिका जेजूरकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. त्यांना ग्रामसेवक अतुल सोनवणे, कर्मचारी कृष्णा बावणे यांचें सहाय्य लाभले. या विशेष सभेस उपसरपंच दिपक खैरनार, ग्रामपंचायत सदस्या चित्रा घे, अश्विनी खैरनार, मीना गोविंद, सरला काकळीज, शोभा पिठे, ग्रामपंचायत सदस्य राहुल पवार आदी उपस्थित होते. या निवडीनंतर ढोल ताशांचा गजर व फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष साजरा करण्यात आला. आ. सुहास कांदे यांच्या सुविद्य पत्नी समाजसेविका अंजुम कांदे,शिवसेना युवा नेते फरहान खान यांनी या निवडीबद्दल नवनिर्वाचित सरपंच सारिका जेजुरकर यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या यावेळी मधुकर ईधें, भागिनाथ गोविंद, शांताराम वाघ, वाल्मीक काकळीज, मुकुंद खैरनार, भाऊसाहेब पिठे, बाळासाहेब महाजन, जयराम मोकळ, सचिन रोहम, युवराज सोनवणे, आबासाहेब खैरनार, रवींद्र आहेर, दिपक खैरनार, विठ्ठल पानसरे, भारत जेजुरकर,पोपट जेजुरकर, गणेश जेजूरकर, समाधान खैरनार, राजू खैरनार, अंबादास जाधव, जीवन खैरनार, योगेश गेजगे,संजय गोरे, संतोष आहेर, सुनील भवर, गोलू घोडके, पवन खैरनार, जयेश खैरनार, गोरख महाजन, चंद्रभान गोविंद आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment