नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमात आपला तालुका बसतो. यामुळे जेव्हाही शासन दुष्काळ जाहीर करेल तेव्हा आपल्या तालुक्याचा त्यात समावेश असेल. मात्र कृषी विभागाच्या वतीने जर नांदगाव तालुक्याला टाळले तर मी हायकोर्टात पिटीशन दाखल करुन नांदगावला दुष्काळग्रस्त जाहीर करून घेईल. यामुळे तालुक्यातील जनतेने अजिबात घाबरू नये आणि संभ्रमात राहू नये असे आश्वासन आमदार सुहास कांदे यांनी दिले. आज तालुक्यातील दुष्काळ परिस्थितीवर आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलते होते.यावेळी तहसीलदार बीडीओ आणि कृषी अधिकारी यांच्यासह तालुक्यातील सर्वच शासकीय यंत्रणा उपस्थित होते.
No comments:
Post a Comment