Wednesday, November 24, 2021

मनमाडच्या जनतेला पंधरा दिवसानंतरही पाणीपुरवठा खंडित !!

.                       वाघदर्डी धरण


मनमाड ( प्रतिनिधी - परवेज शेख ) - मनमाडला धरणाला पाणी , नळाला नाही अशीच परिस्थिती ईथील जनतेवर  आली. वाघदर्डी धरण भरले असल्याने मनमाडच्या जनतेला मात्र कृत्रीम पाणीटंचाईमुळे त्रास सोसावा लागतोय. पंधरा दिवस उलटले तरी मनमाड जनतेला नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभारामूळे पाणीपासून वंचित रहावे लागते. सव्वा लाख लोकसंख्या असलेले शहर आज बोअरवेलचे पाणी पिण्याची वेळ ईथील जनतेवर आली.  हे पाणी प्याल्याने विविध आजाराचा धोका  झालाय . नगरपरिषदे प्रशासन कडून  सांगितलं की , धरणावरील पंपिग मोटारी जळाल्याने पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे , कारणामूळे जनतेस पाणीपासून वंचित रहावे लागते.

             यासाठी जाब विचारणारे लोकप्रतिनीधी, राजकीय पुढारी आणि सामाजिक संघटना पूढे येत नसल्याने नांगरिकांनी रोष व्यक्त केला. सद्या पालिकेवर शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस, कांग्रेस , आरपीआय चारही पक्षाची सत्ता असून, नांगरिकांनी  टँकरने पाणीपुरवठा व्यवस्था करण्याची अपेक्षा व्यक्त केली.  कोरोना आटोक्यात आल्याने लग्नसोहळे सुरु आहे. लग्नसोहळे असल्याने पाहूणाना अंगोळीचे पाणी सोडा प्यायला पाणी व्यवस्था  नाही.  नगरपरिषदे कडून सांगण्यात आले की तीन पैंकी दोन पंपिग मोटारी जळाल्याने पाणी पुरवठास विलंब  होतोय, ढिसाळ कारभाराचा त्रास आम्हाला का असाही प्रश्न नांगरिकाकडून केला गेला. 




             

No comments:

Post a Comment

नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,

नांदगाव (प्रतिनिधी ) -  शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....