नांदगाव शहरातील येवला रोड, ईतर भागातील नवीन रस्ता बनविण्याची मागणी
नांदगांव ( प्रतिनिधी - परवेज शेख ) - नांदगांव शहराच्या जुन्या रेल्वे गेट ते बेलदार वाडी पर्यंत येवला रोड व तालुक्यातील काही भागातील रस्त्यांची परिस्थिती अत्यंत खराब झाली असून सुधारणा त्वरित हाती घेऊन नागरिकांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. रस्त्याची मोठी चाळण झालेली आहे , मोठ- मोठे खड्डे पडले असून नागरिकांना व वाहनांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे यातूून अपघात घडत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी येड्या बाभळी मोठ्या प्रमाणार वाढल्याने वाहन चालकांना पुढील रस्ता दिसेनासा झाला आहे. रस्त्याच्या कडेला गटार नसल्याने मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या बाजूला चिखल साचला आहे. नवीन रस्त्याची मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र स्वरूपाचा आंदोलन करण्यात येईल असा ईशारा दिला . यावेळी माहिती साठी आमदार सुहास आण्णा कांदे , नांदगांव तहसिलदार , पोलीस निरीक्षक नांदगांव यांना निवेदनांची प्रत देण्यात आली. निवेदनावर संतोष गुप्ता , सतिष आहिरे, ज्ञानेश्वर पवार, जहिर सौदागर, संतोष बनगर यांच्या स्वाक्षर्या होत्या.
No comments:
Post a Comment