Sunday, March 19, 2023

गारपीट मुळे नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामा तत्काळ करण्याचे आदेश दिले - आ.सुहास आण्णा कांदे




नांदगाव  ग्रामीण( प्रतिनिधी ) -  नांदगाव तालुक्यात शनिवारी गारपीट व अवकाळी पाउस झाला, या पावसात अनेक शेतकऱ्याचे शेतमालाचे मोठे नुकसान झालेले आहे. पावसाने २१ गावातील २४०० हेक्टर क्षेत्रावरील गहू मका कांदा या पिकांना अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे गहू पिकाचे तसेच रांगडा व उन्हाळी कांदा आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. सलग सहा दिवसांपासून पाचही महसूल मंडळात अवकाळी पाऊस पडत आहे.या मुले शेतकरी हवाल दिल झाला असून शासनाने या परिस्थितीची तात्काळ दाखल घेऊन पंचनामे करून घेणे गरजेचे असल्यामुळे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी काल झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीट मुळे नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामा करण्याचे आदेश यंत्रणांना दिले आहेत.   या प्रसंगी शेतकऱ्यांनी धीर सोडू नये असे आवाहन आमदार सुहास कांदे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...