नांदगाव ग्रामीण( प्रतिनिधी ) - नांदगाव तालुक्यात शनिवारी गारपीट व अवकाळी पाउस झाला, या पावसात अनेक शेतकऱ्याचे शेतमालाचे मोठे नुकसान झालेले आहे. पावसाने २१ गावातील २४०० हेक्टर क्षेत्रावरील गहू मका कांदा या पिकांना अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे गहू पिकाचे तसेच रांगडा व उन्हाळी कांदा आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. सलग सहा दिवसांपासून पाचही महसूल मंडळात अवकाळी पाऊस पडत आहे.या मुले शेतकरी हवाल दिल झाला असून शासनाने या परिस्थितीची तात्काळ दाखल घेऊन पंचनामे करून घेणे गरजेचे असल्यामुळे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी काल झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीट मुळे नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामा करण्याचे आदेश यंत्रणांना दिले आहेत. या प्रसंगी शेतकऱ्यांनी धीर सोडू नये असे आवाहन आमदार सुहास कांदे यांनी केले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
न्यू इंग्लिश विद्यालयात 'जागतिक महिला दिन' उत्साहात साजरा,
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये 'जागतिक महिला दिन' मोठ्या उत्साहात...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच.एस.सी इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आल...
No comments:
Post a Comment