नांदगाव( प्रतिनिधी ) - मणिपूर मध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात आम्ही भारताचे लोक च्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. मणिपूरच्या क्रूर घटनेमुळे भारतीय समाजासमोर जे आव्हान निर्माण झाले आहे. त्याचा सामना करून संविधानिक मूल्य बळकट करणे आवश्यक आहे.याचा विचार करून त्यासाठी नांदगाव शहरात आम्ही भारताचे लोक या नावाने मूक मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथून करण्यात आली होती. ही रॅली नांदगाव तहसील कार्यालयात आल्यानंतर विविध संघटनेचे पदाधिकारी यांनी मणिपूरच्या अत्याचाराच्या विरोधात घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला. या वेळी नायब तहसीलदार प्रमोद मोरे यांना आम्ही भारतीय लोक यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी नांदगाव मधील सुजाता महिला मंडऴ,रमाई मित्र मंडऴ, आदिवासी जनसमुदाय, एकलव्य संघटना, आधार बहुदेशीय संस्था, वंचित बहुजन आघाड़ी चे वाल्मीक जगताप, भारतीय राष्ट्रीय कांग्रेस चे शहर अध्यक्ष मनोज चोपड़े, मनसे महिला शहर प्रमुख रेषा शेलार, संगीता सोनवणे शबाना मन्सुरी, अॅड सचिन साऴवे, महावीर जाधव ,राजू गुडेकार, अनिल जाधव ,विश्वास आहिरे, अरुण साऴवे,व असंख्य आर पी आय चे कार्यकर्त, महिला वर्ग या घटनेविरुध्द एकत्र येऊन या मूक मोर्चात संख्येने सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment