Friday, July 28, 2023

नांदगाव शहरातील रेल्वे पुलाखाली घाण - गाळ, कचरा साचल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडून जाण्याची वेळ, नगरपालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा उघड, नागरिकांची तीव्र संतप्त प्रतिक्रिया,


नांदगाव( प्रतिनिधी) -  नांदगाव पालिका प्रशासनाचा हलगर्जीपणामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आले आहे.  नांदगाव नगर परिषद प्रशासनाचा हलगर्जीपणाचा फटका सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांना बसत असून येण्या-जाण्यासाठी असलेल्या पुलाखाली मोठं मोठे खड्डे, गाळ आणि घाण साचल्यामुळे जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडून जाण्याची वेळ नागरिक आणि विद्यार्थ्यावर आली आहे. नांदगाव शहराच्या मध्य भागातून जाणाऱ्या रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूला शहर, शाळा,बाजारपेठ असून नागरिकांना दोन्ही बाजूला येण्या जाण्यासाठी ब्रिटिशकाळात पूल बांधण्यात आलेला आहे. पुलाच्या वरून रेल्वे तर खालून नागरिकांची ये-जा सुरु असते . मात्र गेल्या एक ते दीड वर्षा पासून पुला खाली मोठं - मोठे खड्डे झालेले असून गाळ, घाण देखील इतकी साचलेली आहे.  पुला खालून जाणे अवघड झाल्यामुळे जीव धोक्यात घालून विद्यार्थी आणि नागरिक रेल्वे रूळ ओलांडून जातात.
रेल्वे रूळ ओलांडून जाताना मोठा अपघात झाल्यास त्याला फक्त नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील अशी तीव्र प्रतिक्रिया येणारं जाणारं नागरिक करत असून, त्यामुळे पुला खाली असलेले खड्डे बुजवून गाळ आणि घाण काढण्याची मागणी नागरिक करत  आहे.

No comments:

Post a Comment

नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,

नांदगाव (प्रतिनिधी ) -  शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....