नांदगाव ( प्रतिनिधी) - आमदार सुहास आण्णा कांदे यांनी याबाबत पाणीपरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या कडे मागणी केली होती यास सकारात्मक प्रतिसाद देत पुढील योग्य कारवाही करावी साठी आदेश संबंधित विभागास दिले आहे.
नांदगाव मतदार संघातील मौजे लोहशिंगवे,पोखरी, चांदोरा, मंगळणे, शास्त्रीनगर, जळगांव खु, धनेर, खादगाव दुष्काळग्रस्त भागात असल्याने नळ पाणी पुरवठा योजनेचा उद्भव असलेल्या ठिकाणी उन्हाळ्याचे कालावधीत भूजल पातळी खोलवर जावून माहे एप्रिल, मे व जून महिन्यात रहिवाशांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे या गावांचा जलजीवन मिशन आराखड्यात समावेश करण्या संधर्भात आमदार सुहास आण्णा कांदे यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
आमदारांच्या पाठपुराव्याची दाखल घेत या गावांचा जल जीवन मिशन आराखड्यात समावेश करण्या बाबत संबंधित विभागास गुलाबराव पाटील यांनी सूचना केल्या आहेत.
आमदार सुहास आण्णा कांदे यांनी संपूर्ण विधानसभा मतदारसंघाची प्रमुख गरज ओळखून पहिल्या दिवसापासून आपले लक्ष पाणी प्रश्नावर केंद्रित केला, सतत शासनाकडे पाठपुरावा केला, आपले वजन वापरत करंजवण मनमाड, ७८ खेडी, दहिवाल सह २६ गाव, नांदगाव पण योजना सारख्या विविध योजना मार्गी लावल्या आहेत यांचे काम जलद गतीने सुरू असून येणाऱ्या काळात पाण्यापासून वंचित असलेल्या शेकडो गावांना नियमित व मुबलक पाणी मिळणार आहे. या शिवाय विविध गावांना जलजीवन मिशन अंतर्गत गावपातळीवर योजना मंजूर करवून घेऊन काम केले आहे.
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या शासनाकडे केलेले सततच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले, आता मतदारसंघाचा पाणी प्रश्न मिटणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
No comments:
Post a Comment