मनमाड (विशेष प्रतिनिधी) - भारतीय रेल्वेच्या वतीने काल अजून सहा वंदे भारत रेल्वेचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले . यातील जालना ते मुंबई या गाडीचे जालना येथून रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण केले. तर मनमाड येथे केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार भुसावळ डिव्हिजनचे डी आर एम इथी पांडे व आमदार नरेंद्र दराडे यांनी स्वागत करून गाडीला पूढे रवाना केले .यावेळी रेल्वेच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत बक्षीस मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले.यावेळी ढोल ताशांच्या गजरात या वंदे भारत रेल्वेचे स्वागत करण्यात आले.यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे ध्वज घेऊन या कार्यक्रमात जल्लोष साजरा केला .कार्यक्रम शासकीय होता की भाजपचा असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला होता.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment