Wednesday, January 31, 2024

राहुरी येथील घटनेचा नांदगाव न्यायालयचे कामकाज बंद करून केला निषेध, आरोपींवर कारवाई करावी वकील संघाकडून नांदगाव नायब तहसीलदारांना निवेदन,




नांदगाव ( प्रतिनिधी) - अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील वकील राजाराम जयवंत आढाव , मनिषा राजाराम आढाव यांची निर्घुणपणे हत्या करुन विहिरीत फेकण्यात आले. या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ नांदगाव न्यायालयातील कामकाज बंद करुन निषेध व्यक्त करण्यात आला. संबंधित आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अश्या प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या. यावेळी नांदगाव न्यायालय ते नविन तहसीलदार कार्यालयापर्यंत व वकील संरक्षण कायद्या पारीत लवकरात लवकर करुन वकीलांना न्याय मिळाला अशी मागणी नांदगाव नायब तहसीलदार चेतन कुणकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नांदगांव येथील समस्त वकील संघाकडून निषेध नोंदवला होता. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब आढाव , उपाध्यक्ष उमेशकुमार सरोदे, सचिव शेखर पाटील, खजिनदार
सुशिलकुमार जाधव, तसेच माजी अध्यक्ष वसंतप आहेर , राजेंद्र दराडे, अँड.बी.आर.चौधरी,
जी.एस.सुरसे, एफ.सी.सोनवणे,ए.के.शिंदे,
पोपटराव घुगे, युनूस शेख, बी.बी.बिन्नर,
अॅड. विजयकुमार रिंढे, महेश पाटील, प्रमोद दौड, पी.एस.पवार, एस.एम.वाळेकर,
एस.जे.घुगे, तुकाराम राठोड, सचिन
साळवे, अमोल आहेर, मनिषा त्रिभुवन, 
वंदना पाटील, अनोबर पठाण, दिगंबर आहेर,
रंजन आहेर, व इतर वकील बंधु यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,

नांदगाव (प्रतिनिधी ) -  शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....