नांदगाव ( प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्यात दहावी एसएससी बोर्डाच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. त्याआधी मंत्री नितेश राणेंनी शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. पत्रात परीक्षेला बुरखा घालून येणाऱ्यांवर बंदी आणावी अशी मागणी केली आहे. राणेंनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्र लिहून ज्या मुली बुरखा घालून परीक्षेला येतील त्यांना केंद्रावर प्रवेश देऊ नये असं म्हटलं आहे. यांवर आता बुरखा घालणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. नांदगावच्या उर्दू शाळेतील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितले की, इस्लाम धर्मात स्त्रीयांना बुरखा घालणे गरजेचे आहे . परिक्षा दालनात बुरखावर बंदी करू नये . परिक्षा जवळ येत असताना अशा वक्तव्यामुळे अभ्यासात दडपण येऊन आमच्या परिक्षेत परिणाम दिसून येणार असं मत विद्यार्थ्यांनी दिलं आहे. तसेच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यांवर बोलताना बुरखा असो किंवा नसो कोणीही विद्यार्थी कॉपी करणार नाही. परिक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्त तैनात असेल अशी माहिती त्यांनी दिली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,
नांदगाव (प्रतिनिधी ) - शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच.एस.सी इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आल...
No comments:
Post a Comment