नांदगाव (प्रतिनिधी) - भारतीय शेतीत गाय हा केवळ प्राणी नसून कुटुंबाचा सदस्य मानला जातो, असे अनेक कथा आणि लोकसाहित्यातून दिसून येते. गाय शेतकऱ्याच्या जीवनाचा आधारस्तंभ आहे, जी त्याच्या शेतीला आणि कुटुंबाला आर्थिक व नैसर्गिकरित्या मदत करते. शहरातील इंद्रायणी नगर मधील निलेश काळे यांनी त्यांच्या कडील देशी गायीच्या वासराचे बारसे वैराग्य मुर्ती ह.भ.प. तुकाराम महाराज जेऊरकर यांच्या उपस्थितीत करुन गोमाते विषयी आदरभाव व्यक्त केला.
हिंदू धर्मात गाईला माता म्हटले आहे. गाय माते प्रमाणेच तीच्या दुधापासून सर्वांचे पोषण करते. तिच्या पासून मिळणाऱ्या अनेक वस्तूंची उपयुक्तता सर्वातीत आहे. शेतकरी गाईला कुटुंबातील सदस्य समजून तिची सेवा करतात शहरातील इंद्रायणी नगर येथील शेतकरी तथा दुचाकी गॅरेजचे संचालक निलेश काळी यांच्या कडील देशी गाईने नुकताच एका वासराला जन्म दिला. परिवारातील सर्वांना आनंद झाला. वासराचे बारसे करावे अशी काळे परिवाराची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. अखेर तो योग जुळून आला. रविवार (दि.२८) रोजी सायंकाळी वैराग्य मुर्ती ह.भ.प. तुकाराम महाराज जेऊरकर आणि नवनिर्वाचित नगराध्यक्ष सागर हिरे यांच्या उपस्थितीत गौरी या वासराचे पाळणा हलवून बारसे करण्यात आले. यावेळी नातेवाईक, आप्तेष्टांना, मित्र यांना आमंत्रित करण्यात येवून स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी नांदगाव नगरपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निवडून आलेले लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे तथा वीस नगरसेवकांचा सत्कार काळे परिवाराच्या वतीने करण्यात आला. यावेळी जगनराव काळे, निलेश काळे, अनिल काळे, ओम काळे, गौरव काळे, कार्तिक काळे, शृती काळे,
तथा काळे परिवार आणि इंद्रायणी नगर मधील तुलसी काळे, दिक्षा आदींसह इंद्रायणी नगर मधील रहिवासी नातेवाईक मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment