Tuesday, March 31, 2026

नांदगावात भगवान महावीर जयंतीनिमित्ताने प्रभातफेरी,





नांदगांव (प्रतिनिधी) - संपूर्ण विश्व युद्धामुळे धुमसत असतांना , शांती,करुणा, दया व अहिंसेची शिकवण देणारे" जगा आणि जगू द्या "हा दिव्य संदेश देणारे भगवान महावीरांचे विचार व तत्वज्ञान याची आजच्या युगात सर्वाधिक आवश्यकता असल्याचे प्रतिपादन जैन तत्वज्ञानाचे अभ्यासक व वक्ते आशिष कुमार छाजेड( नाशिक ) यांनी केले. ते सकल जैन समाज व विधीज्ञ जयकुमार कासलीवाल गौरव समिती आयोजित भ. महावीर जयंती व्याख्यानमालेचे पंचविसावे पुष्प गुंफतांना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी . ॲड. जयकुमार कासलीवाल हे होते . याप्रसंगी व्यासपीठावर ओसवाल श्वेतांबर जैन संघाचे अध्यक्ष दत्तराज छाजेड, खंडेलवाल दिगंबर जैन पंचायतीचे अध्यक्ष सुमेर कासलीवाल, सुभाष लोढा, महामंत्री महावीर पांडे, सचिन म. पारख आदी मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक दत्तराज छाजेड यांनी केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय शैलेश चोपडा यांनी करून दिला.तर  ॲड. कासलीवाल यांनी अध्यक्षीय समारोप केला . मंगलाचरण व स्वागत गीत सौ सारिका पाटणी व सौ.यशश्री सुराणा यांनी सादर केले. सूत्रसंचालन कु. इशिका अजमेरा यांनी तर आभार प्रदर्शन संजय लोहाडे यांनी केले . भ.महावीर जयंती निमित्ताने सकल जैन समाजाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे प्रभात फेरी काढण्यात आली . भगवान महावीर मार्गावरील ख. दि. जैन मंदिर येथून प्रारंभ होऊन ओसवाल भुवन मार्गे विविध चौकातून जाऊन स्व. ज.ता.का. जैन धर्म शाळेत येताच सकल जैन समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले याप्रसंगी जैन बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

नांदगावात भगवान महावीर जयंतीनिमित्ताने प्रभातफेरी,

नांदगांव (प्रतिनिधी ) - संपूर्ण विश्व युद्धामुळे धुमसत असतांना , शांती,करुणा, दया व अहिंसेची शिकवण देणारे" जगा...