एसटी धावत नाही, रेल्वे थांबत नाही !
नांदगांव ( प्रतिनिधी - महेश पेवाल ) - गेल्या अनेक दिवसापासून एसटी कर्मचार्याचा संप सुरूच आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलेल्या अल्टीमेटची मुदत संपली असून एसटी कर्मचारी संपावर ठाम असल्याने एसटी रस्त्यावर धावत नाही. प्रवास करण्यासाठी रेल्वे आहे मात्र नांदगांव रेल्वे स्टेशनला थांबणार्या रेल्वे गाड्या कमी आहे. मग प्रवास कसा करायचा असा प्रश्न सर्व सामान्य करीत आहे.
खाजगी वाहनाने प्रवास करणे महाग असल्याने सर्व सामान्य नागरिक प्रवास कसा करणार रेल्वे प्रशासनाने चाळिसगांव- धुळे अशी मेमू रेल्वे सेवा सुरू केली . ही मेमू रेल्वे सेवा मनमाड - धुळे अशी सुरू केली तर रेल्वे प्रशासनाला फायदा होईल आणि मनमाड - नांदगांव च्या परिसरातील प्रवाशाना सोय होईल चर्चा सर्वसामान्य नांगरिक करीत आहे.
No comments:
Post a Comment