नांदगाव (प्रतिनिधी) - नमन एज्युकेशन सोसायटी संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूल नांदगाव शाळेमध्ये एक राखी जवानों के नाम हा उपक्रम राबविण्यात आला .
आज विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत
नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल सर, उपाध्यक्ष सौ.सरिता बागुल ,रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सुर्यवंशी मॕम यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. नवीन शैक्षणिक वर्षात ८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी राखी आणली होती. सुषमा बावणे यांनी सैनिकांचे महत्त्व सांगितले. नंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. देशाचे संरक्षण करणारे सैनिक विविध सण उत्साह आपल्या कुटुंबियांसोबत साजरे करू शकत नाही. भाऊ बहिणीच्या पवित्र नात्यातील राखी बंधनातही बहीण आपल्या भावाला राखी बांधू शकत नाही. अशा अनेक सैनिक भावांसाठी "एक राखी जवानों के नाम" या उपक्रमाद्वारे राख्या सीमेवरील सैनिकांना पाठविण्यात आल्या. सर्वप्रथम शाळेचे अध्यक्ष बागुल सर तसेच उपाध्यक्ष बागुल यांनी पुढाकार घेऊन राखी दिली. त्यानंतर प्रिन्सिपल मॅम तसेच सर्व शिक्षक वर्ग आणि सर्व विद्यार्थ्यांनी राख्या जमा करून "ये धागा हे आस का, ये धागा हे विश्वास का, ये धागा प्यार का रक्षाबंधन के त्योहार का" अशा प्रकारे सर्व सैनिक बांधवांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. यात सकाळ न्युज पेपर चे पत्रकार बाबासाहेब कदम यांनी प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन आणि त्या सर्व राख्या आपल्या बॉर्डरवरील सैनिकांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी उचलली.
हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पाडण्यात रेंनबो इंटरनशनल स्कूलच्या शिक्षिका रूपाली शिंदे , सुषमा बावणे ,एडना फर्नांडिस ,मोनाली गायकवाड , चैताली अहिरे , रोहिणी पांडे , तसेच मदतनिस वैशाली बागूल, छाया आवारे, अनिता नेमणार, रवींद्र पटाईत तसेच ड्रायव्हर मंगेश शिंदे, विनोद चौधरी, बाळू गायकवाड, सागर कदम, नासीर खान पठाण, चंद्रकांत बागूल, गजानन पवार यांनी अतोनात मेहनत घेऊन हा नवीन उपक्रम राबविण्यात आला .
No comments:
Post a Comment