नांदगाव ( प्रतिनिधी) - आज नांदगाव मध्ये रेल्वे थांब्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले होते. मुख्य बाजारपेठ असल्याने प्रत्येकाचे या आदोलनाकडे लक्ष वेधले होते. शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ नांदगाव रेल्वे स्थानकावरील गाड्याच्या थांब्या करीता "आम्ही नांदगावकर, प्रश्न-माझ्या गावाचा " यांच्या तर्फे सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत धरणे आदोलन करण्यात आले. नांदगाव रेल्वे थांबे , पादचारी पुल तसेच अशा अनेक समस्या सुटण्यासाठी यावेळी अनेक मागण्या रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आल्या. सर्व गाड्याचा थांबा नसल्याने पेशेंन्ट, नागरिक, व्यापारी, विद्यार्थी यांचे हाल होत आहे. यासाठी कोविड-19 काळापूर्वी थांबणाऱ्या सर्व एक्सप्रेस ट्रेन्स ला नांदगाव स्टेशनवर पुन्हा थांबे बहाल करावे , नांदगावकर अशी मागणी करत आहे . रेल्वे प्रशासनाने फक्त काशी , महानगरी एक्स्प्रेसला दोन गाड्याना थांबा दिला आहे. तर जनता, कुर्शीनगर, झेलम, कामायनी, शालीमार, हुतात्मा एक्सप्रेस गाड्याना थांबा मिळावा अशी मागणी आहे. आता बाकी गाड्यासाठी मागणी जोर धरू लागली आहे .प्रवांशाच्या सोयी होईल अशा रेल्वे गाड्याना थांबा मिळणे गरजेचे आहे . नांदगावकरांची मागणी मान्य झाली नाही तर तीव्र स्वरूपाचा आंदोलन करण्यात येईल, प्रशासनाने मागणीची दखल घ्यावी असाही ईशारा देण्यात आला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,
नांदगाव (प्रतिनिधी ) - शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच.एस.सी इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आल...
No comments:
Post a Comment