नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगावच्या रेल्वे प्रवाशी यांची काल दि. ७ अॉगस्ट रोजी एक सामुहिक बैठक झाली. यात सर्व रेल्वे प्रवाशी दररोज रेल्वे थांबा नसल्याने हाल होत आहेत. कोरानाचे कारण देत रेल्वेने नांदगावचे थांबे बंद केले होते. कोरोना -19 चे कोविड स्पेशल गाडीला नांव देण्यात आले होते. आता ते पूर्वी प्रमाणे सुरळीत झाले आहेत. तरीही नांदगावचे थांबे रेल्वेने खोटे आश्वासन देत गेले . रेल्वेवरीष्ठ अधिकारी पर्यंत रेल्वे थांब्याच्या समस्या पोहचवणे गरजेचे आहे . म्हणुन त्या सर्दभात एक बैठक घेतली. पुढचे पाऊल आम्ही लवकरात लवकर उचलणार आहोत . आम्हाला पूर्वी होते ते थांबे परत मिळावे, अशी पूर्ण नांदगाव प्रवाशी यांची आहे. यावेळी तुषार पांडे , बबलु सय्यद, हनीफ शेख , दिनेश पिंगळे , प्रशांत साळवे, कलीम तडवी, सचिन महिराल ,संतोष गुप्ता, उमेश उगले ,चंदु संगवे आदीची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment