नांदगाव (प्रतिनिधी) - शहरातील एकमेव असलेल्या समशानभूमीकडे जाणान्या रस्त्यावर पुलासह रस्ता व्हावा, यासाठी लक्ष वेधण्यासाठी तिरडीयात्रा व प्रतिकात्मक सरणावर बसून आंदोलन करण्याचा इशारा तुम्ही आम्ही नांदगावकरांच्या वतीने वाल्मिक टिळेकर, सागर आहेर, विशाल बडले, प्रवीण सोमासे, संतोष गुप्ता आदिंनी दिला आहे. हे आंदोलन २४ नोव्हेंबरला होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील मुख्य समशानभूमी असलेल्या रस्त्याची दुरावस्था झाली असल्याने अंत्यविधीसाठी जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास होत आहे. याच सत्याला पुढे एकलव्य वस्ती, वडाळकर वस्ती, पठाडे वस्ती आदी नागरी वसाहती असून, आदिवासी बांधवांच्या वस्तीकडे जाणान्या रस्त्याची चाळण झाली आहे.
पुल नसल्याने पाण्यातून अंत्ययात्रा करावी लागत असल्याच्या घटना नित्याच्याच बनल्या आहेत. पूल नसल्यामुळे नदीपात्रातूनच मार्ग काढावा लागतो याविरोधात लक्ष वेधण्यासाठी यात्रा व प्रतीकात्मक सरचार बसून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आल्याने प्रशासकीय यंत्रणेला त्याची दखल प्यावी लागेल, असे दिसते विवेक हॉस्पिटल ते स्मशानभूमी रस्ता अशी तिरडीयात्रा काढण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment