Tuesday, April 11, 2023

शेतकऱ्यांचे पिकांचे १००% पंचनामे केले जातील आणि नुकसान भरपाई मिळवून दिली जाईल : आमदार सुहास आण्णा कांदे



  नांदगाव ग्रामीण (प्रतिनिधी) -   नांदगांव तालुक्यातील घाटमाथा परिसरावर झालेल्या गारपिट अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते . ह्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी  आमदार सुहास कांदे हे थेट शेतकऱ्याचं बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून दोन दिवसात परिसरातील सर्व शेतकऱ्यांचे १००%पंचनामे करण्याचे आदेश प्रशासकीय यंत्रणेला दिले. यासाठी अधिकारी व कर्मचारी यांची संख्या त्वरित वाढविण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. 
        आमदार सुहास कांदे यांनी बोलठाण, जवळकी, जातेगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे पाहून आमदार भावुक झाले. वर्षभर पोटच्या मुलासारखे पीक जपून नैसर्गिक आपत्तीने क्षणात नाहीसे होणे अतिशय वेदनादायी आहे. मीही शेतकऱ्याचा मुलगा असल्याने मला याची पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे धीर सोडू नका आमदार व सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. लवकरात लवकर आपल्याला ही झालेली नुकसान भरपाई मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील, असे आश्वासन यावेळी आमदार सुहास कांदे यांनी दिले.
       या प्रसंगी तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी विभागाचे सर्व कर्मचारी, सरपंच वाल्मीक गायकवाड, अनिल रिंढे, रफिक पठाण, गोकुळ कोठारी, गुलाब चव्हाण, मनोज रिंढे, अनिल सोनवणे, गणेश व्यवहारे, संदीप सूर्यवंशी,भाऊसाहेब सूर्यवंशी,बंडू पाटील,गूलाब पाटील,संतोष गायकवाड,शरद पवार,सुभाष पवार,भरत गायकवाड,नाना थोरात,अंकूश पगारे,मारुती सोनवणे,रमेश पाटील, ग्रामविकास अधिकारी भगवान जाधव यांच्या सह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...