नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव शहरातील वीरशैव लिंगायत / जंगम/ गवळी समाज बांधवांच्या मागणी नंतर आमदार सुहास आण्णा कांदे यांनी तात्काळ समाज स्मशानभूमी संरक्षक भिंतीसाठी १५ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता.
या संरक्षक भिंतीचे भूमिपूजन आज अंजुम ताई कांदे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी बोलतांना सोमनाथ घोंगाणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आमदार सुहास अण्णा कांदे यांचे आभार मानले, आमच्या समाजाची २५ वर्षापासूनची मागणी आज पुर्ण झाली आज पर्यंत आमचा संख्येने कमी असल्याने आमच्या समाजाकडे कोणीही लक्ष दिले नाही पण आमदार सुहास आण्णांनी मात्र आमची मागणी तात्काळ पूर्ण केल्याचा आम्हाला मोठा आनंद होत आहे, आम्ही सतत आण्णांच्या पाठीशी होतोच आणि या पुढेही राहू असे मत या वेळी सोमनाथ घोंगाणे यांनी व्यक्त केले.
यावेळी अंजूमताई कांदे यांचा सत्कार सुचीत्रा जंगम , मनीषा जंगम , रोहीणी जंगम यांनी केला.
या प्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या शहराध्यक्ष रोहिनीताई मोरे, भाउराव बागुल, रोहित काकलीज, सोमनाथ घोंगाणे, वैजीनाथ जंगम, शिवलींग जंगम, बाळू जंगम , गणेश जंगम, शुभम जंगम, तान्हाजी जंगम, कैलास जंगम, सतीष जंगम, विकी जंगम, तुषार जंगम, मुकेश जंगम, अरूण जंगम, छगन अप्पा गवळी ' सुशील औषीकर, राहूल पिरनाईक, राजू काटकर सर, अर्जुन गवळी, भटू औशीकर, अशोक पंगूडवाले, विश्वनाथ उचे, कैलास उचे, सुनील औशीकर, विश्वनाथ उचे, मगन ऒशीकर, तुकाराम गवळी, लहानु झारकंडे, गंगा ओशीकर
श्रीमती लिलाबाई जंगम , सौ. कमलबाई जंगम, सौ. सुचीत्रा जंगम, शिवकन्या जंगम,मनीषा जंगम, प्रिती जंगम, रोहीणी जंगम आदी समाज बधू भगिणी उपस्थित होत्या .
No comments:
Post a Comment