नांदगाव (प्रतिनिधी ) - लक्ष्मीनगर येथे भाजप तर्फे "मेरी मिट्टी मेरा देश" अभियान जेष्ठ नेते आनंदराव घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात आले. भाजपाच्या जेष्ठ नेत्या अॅड. जयश्रीताई दौंड अभियानात सहभागी झाल्या होत्या. देशासाठी बलिदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी लक्ष्मीनगरच्या ग्रामस्थांसह महिला व अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदवला.
दिल्ली येथे निर्माण होणाऱ्या स्वातंत्र्य सैनिक, हुतात्मे, शहिद वीर जवान आणि वीरांगना यांच्या स्मारकासाठी हा अमृत कलश जाणार आहे. राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आणि राष्ट्रीय भावना जोडण्याचं काम या माध्यमातून होणार आहे. अशी माहिती अॅड जयश्री ताई दोंड यांनी सांगितली. भारतीय जनता पार्टीच्या नांदगाव तालुका अध्यक्षा (भालूर) सौ. मंदाकिनी भारत काकड यांनी "मातीला नमन वीरांना वंदन" करण्यासाठी उपस्थित असलेल्या ग्रामस्थ व मान्यवरांचे अभिनंदन केले व आभार मानले. नांदगाव भाजपा तर्फे हे अभियान राबविण्यात आले. मेरी मिट्टी मेरा देश, भारत माता की जय, वंदेमातरम्, भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. या प्रसंगी भाजपचे डाॅ. राजेंद्र आहेर, जेष्ठ नेते भगवानजी सोनवणे,नामदेवजी शिंदे, डॉ. बी. के. आहेर, राजेंद्र भाऊ काजळे, सचिन थेटे, सचिन गाठबांधे, भारत काकड सर, आंबादास गवळी,कारभारी जाधव, अर्जुन उगले, यादव जाधव,हिरामण पवार, दिनकर साेनवणे, नामदेव पाटील, पुंजाराम जाधव, समाधान उगले, आसाराम गवळी, यशवंत जाधव, योगेश सोनावणे, सुकदेव दळे, मच्छिंद्र घाडगे, मधुकर राजगुरू, नारायण उगले, राजेंद्र जाधव,दत्तात्रय महाडिक,रमेश सोनावणे,चिंधु गरूड, सौ. जयश्री सोनवणे, उषाबाई सोनवणे, मनिषा राजगुरू, सुशिलाबाई सोनवणे, गौरी राजगुरू,वाल्याबाई सोनवणे, राधिका सोनवणे तसेच लक्ष्मीनगरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment