नांदगाव (प्रतिनिधी )- नांदगांव तालुक्यामध्ये या वर्षी सर्वात कमी पर्जन्यमान झालेले आहेत. यावर्षीच्या जून महिनापासून पाऊसाने दडी मारली तर आत्तापर्यंत अतिशय अल्प १८६.३ मिली पाऊस झाल्याने तालुक्याची आणेवारी ३६ पैशांपर्यंत आहे. तालुक्यात खरीप हंगामाची पीक जमिनीतून फक्त उगवली आहेत. पुढील वाढीसाठी पाऊसचं पडला नाही. ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान सलग महिनाभर पाऊस न पडल्यामुळे संपूर्ण खरीप हंगाम होरपळून गेला. त्यामुळे खरीप हंगामाचे हंगामाचे १००% टक्के नुकसान झाले आहे. जनावरांना चाराही राहिलेला नाही. जनावरं व माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहेत. हातांना काम नाही. बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहेत.
तालुक्यात सर्वात कमी पर्जन्यमान व सर्वात कमी पिकांची आणेवारी लागली आहेत. अशा प्रकारचे दुष्काळाची दाहकता नांदगाव तालुक्यात कधीही जाणवली नाही. अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना आजपर्यंत नांदगाव तालुका दुष्काळ म्हणून जाहीर झालेला नाही. तरी परिस्थितीचे अवलोकन करून तात्काळ नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा.
नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर न झाल्यास मंगळवार दिनांक- ७ नोव्हेंबर पासून नांदगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने (अजित दादा पवार गट) उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे निवेदन नायब तहसीलदार केतन कोनकर यांना देण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष विजय पाटील, नगरसेवक विलास राजुळे, महिला तालुकाध्यक्ष योगिता पाटील, युवक तालुकाध्यक्ष सोपान पवार, सामाजिक न्याय विभाग राजेंद्र लाठे, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष वाल्मीक टिळेकर, देवदत्त सोनवणे, युवक शहराध्यक्ष गौतम जगताप, पंडित सूर्यवंशी, अशोक पाटील, अलका आयनोर, हेमंत देहाडराय, प्रशांत बोरसे, जगदीश सुरसे, शुभम बोरसे, जयवंत सुरसे, शंकर शिंदे, राजेंद्र सावंत, करूणा कासार, लक्ष्मण बोगीर, वाल्मीक वाघमारे, नितीन गांगुर्डे, पंढरीनाथ वाघमारे, संजय सोमासे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment