नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव तालुक्यातील चिंचविहीर येथील दोन तरुणींची बंधाऱ्याच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दि. ८ ला घडली. यात पूजा अशोक जाधव वय (१६), खुशी देवीदास भालेकर (१६) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने चिंचविहिर गावात हळहळ व्यक्त होत आहे.
चिंचविहीर येथील पूजा जाधव, खुशी भालेकर, कावेरी भालेकर या तीन तरुणी कपडे धुण्यासाठी बंधाऱ्यावर गेल्या असताना ही घटना घडली. कावेरी भालेकर हिला पुढील उपचारासाठी मालेगाव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पूजा व खुशी यांचा पाय घसरून पडल्यामुळे एकमेकांना वाचविण्यासाठी प्रयत्नात दोघी खोल पाण्यात बुडाल्या. काही तरुणांनी तातडीने मदत करत बंधाऱ्यात बुडालेल्या तरुणीना तातडीने नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, डॉ. राठोड यांनी दोघींना मृत घोषित केले. याप्रकरणी नांदगाव पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment