मनमाड (विशेष प्रतिनिधी ) - दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी दि. 25 जुलै रोजी नवी दिल्ली येथे रेलभवनात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन मतदार संघातील रेल्वे संबधी विविध समस्यावर चर्चा केली. यात मतदार संघातील नागरिकांना प्रवासी सुविधा पूर्ववत करण्यात याव्यात. तसेच मतदार संघातील विविध रेल्वेसाठी थांबे यावर चर्चा करण्यात आली. काही रेल्वेच्या वेळेत बदल करण्यात याव्यात असे विषय समाविष्ट होते. खासदार भास्कर भगरे यांनी खासदार झाल्या पासून अनेक विषय केंद्र व राज्य स्तरावर मांडून मतदारसंघाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. निवडणूक प्रचारात त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी आश्वासन दिले होते. मनमाड़ येथे नवीन प्रस्तावित एलएचबी पीओएच कारखान्यासाठी मंजूरी देण्यात यावी. हा कारखाना झाला तर अनेक युवकांना रोजगार मिळेल. केंद्रीय इंजीनियरिंग कारख़ाना मनमाड़च्या रिक्त जागा भरण्यात याव्या. केंद्रीय इंजीनियरिंग कारख़ाना मनमाड़ला भरपूर वर्कलोड देण्यात यावा अशा विविध विषयांवर रेल्वेमंत्री
अश्विनी वैष्णव यांचेशी चर्चा केली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सर्व विषयावार सकारात्मक चर्चा केली. यावेळी समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.
No comments:
Post a Comment