नांदगाव (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्डाच्या शुक्रवार दि. २६ जुलै रोजी होणाऱ्या पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात राज्यात अनेक जिल्ह्यांत होणाऱ्या अतिवृष्टी मुळे बदल करण्यात आला आहे. अशी माहिती नांदगाव तालुका गटशिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले यांनी सोशल मिडियाला दिली आहे. त्यानुसार १० वी चा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग-२ (७२-२) शुक्रवार दि. २६/०७/२०२४ रोजी सकाळ सत्र ११-०० ते १-०० होणारा पेपर नवीन वेळापत्रकानुसार. विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग-२(७२-२) हा पेपर बुधवार दि.३१/०७/२०२४ रोजी सकाळ सत्र ११-०० ते १-०० वाजता होणार आहे. तर बारावीचा शुक्रवार दि.२६/०७/२०२४ रोजी सकाळ सत्र ११-०० ते २-०० या वेळेत होणारा पेपर वाणिज्य संघटन व व्यवस्थापन (५१) व अर्थशास्त्र व तंत्रज्ञान (६२),
एम.सी.व्ही.सी.पेपर-२ EB to XB-२० विषय हे पेपर आता नवीन वेळापत्रकानुसार शुक्रवार दि. ९/०८/२०२४ रोजी सकाळ सत्र ११- ते २-००या वेळेत संबंधित केंद्रावर आयोजित करण्यात आला आहे.
यांची संबंधित परीक्षार्थीनी नोंद घ्यावी. व वरील बदल झालेल्या वेळापत्रकाची झालं घेऊन परीक्षार्थीनी झालेल्या बदलानुसार परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे असे मेधा निरफराके सहसचिव राज्य मंडळ, पुणे -४ व नांदगाव तालुका शिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment