Thursday, March 5, 2026

नस्तनपूर रेल्वे उड्डाणपूल भूसंपादन संदर्भात शेतकऱ्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट,






नांदगाव ( प्रतिनिधी)  -  नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड ते न्यायडोंगरी दरम्यानच्या नस्तनपुर रेल्वे फाटकावरील प्रस्तावित उड्डाण पुलाचे कामामुळे होणाऱ्या भू-संपादनातील तांत्रिक अडचणी व रास्त मोबदला ह्या संदर्भात शेतकऱ्यांनी खासदार भास्करराव भगरे सर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी  आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करून सर्व तांत्रिक अडचणी आणि मोबदला मिळण्यातील शेतकऱ्यांच्या शंका ह्या संदर्भात सखोल माहिती देऊन शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी काहीही अडचण येणार नाही असे जिल्हाधिकारी यांनी आश्वासित केले. तसेच उप जिल्हाधिकारी श्रीमती भोसले मॅडम ह्यांना योग्य सूचना देऊन कोणतीही अडचण न होता प्रत्यक्ष स्थळ पंचनाम्यानुसार होणारे भू संपादन,पिकहानी, स्थावर मालमत्ता, पाईप लाइन, वृक्षतोड ह्या सर्व बाबींचा मोबदला बाधित शेतकऱ्यांना देण्यात येणेकामी सूचना देण्यात आल्या. शिष्टमंडळातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकी बद्दल समाधान व्यक्त केले. शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे,ॲड प्रमोद अगोणे , संदीप पवार,सौरभ गरुड,भाऊसाहेब वामन, बाळू म्हस्के, वाल्मीक म्हस्के, नितीन आहेर, आप्पा शिंदे, आबासाहेब मवाळ, अशोक गुंजाळ यांचा सहभाग होता.

No comments:

Post a Comment

नस्तनपूर रेल्वे उड्डाणपूल भूसंपादन संदर्भात शेतकऱ्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट,

नांदगाव ( प्रतिनिधी)   -  नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड ते न्यायडोंगरी दरम्यानच्या नस्तनपुर रेल्वे फाटकावरील प्रस्तावित उड्डाण पु...