नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगांव शहरात रामनवमी उत्सव निमित्त केंद्रीय राज्य मंत्री भारती पवार उपस्थित होत्या. रामनवमीचे औचित साधुन शिवसंस्कार बहुउद्देशीय संस्थेने निवेदन दिले की असे मनमाड कुर्ला टर्मिनन्स गोदावरी एक्सप्रेस मनमाड़ छत्रपती शिवाजी टर्मिनन्स पंचवटी एक्सप्रेस या दोन्ही प्रवाशी रेल्वे गाड्या मनमाड रेल्वे स्टेशनवरुन सुटतात. मात्र नांदगांव शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातुन व्यवसाय, नोकरी, शिक्षण व दैनंदिन कामासाठी शेकडो प्रवासी नाशिक, इगतपुरी व मुंबई येथे ये -जा करत असतात. परंतु नांदगांव येथून कार्यालयीन व शालेय वेळेशी सलग्न अशी एकही प्रवाशी रेल्वे गाड़ी नसल्यामुळे प्रवाशाची गैरसोय होत असते. त्यामुळे नांदगांव रेल्वे स्टेशनवरून या वेळेत प्रवाशी रेल्वे गाड़ी सुरु करण्यात यावी अशी प्रवाशांची तसेच नागरिकांची अनेक दिवसांची सातत्यांची मागणी आहे. तरी नांदगांव शहर व तालुक्यातील प्रवाशांची गैरसोय दूर होण्यासाठी १) मनमाड कुर्ला टर्मिनल गोदावरी एक्सप्रेस व २) मनमाड छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल पंचवटी एक्सप्रेस अप १२११० व डाउन १२१०९ या दोन्ही प्रवाशी रेल्वे गाड्यापैकी एक प्रवाशी रेल्वे गाड़ी नांदगांव रेल्वे स्टेशन वरुन सुरु करण्यात यावी अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,
नांदगाव (प्रतिनिधी ) - शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच.एस.सी इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आल...
No comments:
Post a Comment