नांदगाव ( प्रतिनिधी) - युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतापासूनच थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे कार्यकर्ता जोडला तर आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार विजयी होईल यात शंका बाळगण्याचे कारण नाही. मात्र आपण निवडणूक लागली तरच तिची तयारी पंधरा दिवसात करतो असे न करता आतापासूनच तयारीला लागा असे आवाहन याप्रसंगी प्रदेशअध्यक्ष श्री मेहबूब शेख यांनी केले. शंभर वर्ष शेळी म्हणून जगण्यापेक्षा दहा दिवस वाघासारखे जगा तुम्ही किती दिवस जगले यापेक्षा कसे जगले ते लोकांनी नाव घेतले पाहिजे चिल्लर चा आवाज केला तर तो मोठा असतो तर नोटांचा आवाज होत नाही मात्र किंमत मोठी असते आपल्या माणसाची किंमत मोठी आहे आपला माणूस सुशिक्षित आहे त्यामुळे युवकांनी न घाबरता अंगावर आले तर शिंगावर घेण्याचे काम युवक राष्ट्रवादी काँग्रेसने करावे असे प्रदेशाध्यक्ष शेख यांनी सांगितले. यावेळी मा.आमदार पंकज भुजबळ, संजय पवार, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, युवक जिल्हाअध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, विधानसभा अध्यक्ष विनोद शेलार,तालुकाध्यक्ष विजय पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद सोनवणे, युवक तालुकाध्यक्ष सोपान पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, माजी आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार संजय पवार,युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग,तालुकाध्यक्ष विजय पाटील, माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, शहराध्यक्ष बाळकाका कलंत्री, मनमाड शहराध्यक्ष दीपक गोगड, डॉ वाय.पी.जाधव उपस्थित होते.
याप्रसंगी युवक शहराध्यक्ष गौतम जगताप,हबीब शेख, नगरसेवक वाल्मीक टिळेकर,नारायण पवार, राजू लाठे,दत्तू पवार, सचिन जेजुरकर, अशोक पाटील,डॉ. भरत जाधव, किसनराव जगधने,प्रताप गरुड, शिवा सोनवणे, दया जुन्नरे, निलेश पवार, संपत पवार, संतोष बिन्नर, शिवा माळी, अक्षय पवार, गणेश चव्हाण, शुभम शिंदे, विशाल काळे, यश चव्हाण, विकास उशिरे,राहुल आहिरे, पंढरीनाथ गायकवाड, आकाश शेलार, किशोर महाजन, नरेंद्र महाजन, बापू रौंदळ,अक्षय देशमुख दिलीप निकम,महेश पवार, योगिता पाटील, सुगंधा खैरनार, जयश्री जुन्नरे, कविता राऊत आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद शेलार यांनी केले.
No comments:
Post a Comment