नांदगाव तालुका शिवसेनेच्या वतीने निवेदन नांदगाव तहसीलदार यांना देताना
नांदगाव ( प्रतिनिधी) - संपूर्ण महाराष्ट्र मध्ये लम्पि जनावरं वर येणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून हा गोधना वर येणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव मुळे गोधनावर मोठं मोठं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. पशुवैद्यकीय विभागाकडून शेतकऱ्यांना या रोगा संदर्भात योग्य मार्गदर्शन व प्रतिबंध उपाययोजना व लसीकरण व्हावेत या पशुरोगावर तालुक्यातही पशुवैद्यकीय सुस्त यंत्रणा चुस्त दुरुस्त करण्यात यावी व सातत्याने कांद्याच्या च्या भावात घसरण झाल्याने व उत्पादन खर्चा एवढाही भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे . कांद्याच्या कोसळले भावात शेतकऱ्यांना त्वरित किंट्टल मागे २०००₹ रुपयाचे अनुदान देण्यात यावे तसेच योग्य माफक भाव मिळावे म्हणून भाव वाढीसाठी शासनातर्फे उपाय योजना करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा या मागणीसाठी हे निवेदन नांदगाव तालुका शिवसेनेच्या वतीने नांदगाव तहसीलदार यांना देत तरी शासन व प्रशासनाने या बाबीची योग्य व गंभीर दखल घेऊ शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही विनंती करण्यात आली आहे.
याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश धात्रक , उप जिल्हा प्रमुख संतोष बळीद, जिल्हा संघटक संजय कटारिया, तालुका प्रमुख संतोष गुप्ता, उप.ता. शशीकांत मोरे, दिनेश केकान, लिकायत शेख, अनिल दराडे, स्वराज देशमुख, विजय मिश्रा , राजाभाऊ आहेर, शैलेश सोनवणे ,प्रमोद पाचोरकर ,संजय पवार ,सागर सांगळे, प्रवीण धकराव, दिलीप नंद ,अशोक चोळके, मुराद शेख संजय बच्छाव, सनी फसाटे, निवृत्ती गुंजाळ, रामकृष्ण शिपणकर ,लक्ष्मण झाडे, मधुकर झाडे, मधुकर सानप, दत्तातय चोळके ,न्यानेश्वर पवार, आदींची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment