नांदगाव (प्रतिनिधी) - आमदार सुहास आण्णा कांदे संपर्क कार्यालय नांदगाव येथे शिवसैनिकांनी फटाखे फोडत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत शिंदे सरकार अबाधित असल्याचे सांगितले. गेलो काही दिवस अनेक जन हे सरकार पडेल म्हणून आशावादी होते. पण एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात मोठा विकास होत होता .हे विरोधकांना पाहवत नव्हतं शेवटी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात सरकार ला कुठलाही धोका नसल्याचे स्पष्ट झाले, अशी शिंदे गटाकडून प्रतिक्रिया दिली आहे
या नंतर शिवसेनेतर्फे फटाखे वाजवत, पेढे भरवत आनंद साजरा करण्यात आला.
या प्रसंगी शिवसेनेचे भावराव बागुल, अय्याज शेख, शशी सोनावणे, शाम हिरे, गणेश कुमावत, भूषण थोरात, परवेझ पठाण, भरत पारख आदि उपस्थित होते.
No comments:
Post a Comment