नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव शहरातील इंद्रायणी नगर (चांडक प्लॉट), जय भोले नगर, करीम चाळ येथील समस्या वारंवार निवेदने देऊनही सुटत नाहीत. वरील प्रश्नांवर आम्हाला वारंवार विनंती करूनही आम्ही आमच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने महावीर जाधव यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा नगरपालिकेला दिला आहे.
नगरपालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इंद्रायणी नगर (चांडक प्लॉट), जय भोले नगर व करीम चाळ याभागात मागील वर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते. नागरिकांना मुख्य बाजारपेठेत जाण्यासाठी रस्ता नाही. आमच्या कॉलनीतील एक शाळा आहे जेथे मुलांना आणि पालकांना त्यांच्या लहान मुलांना शाळेत नेण्यासाठी खूप त्रास होतो. आजही रस्ता नाही.रेल्वे पुलाजवळ तिसऱ्या लाईनच्या कामामुळे आमचा मुख्य रस्ता बंद आहे.काम पूर्ण झाल्यावर तो बंद केला जाईल.गेल्या २ वर्षापासून लेंडी नदीपात्रात मोठा पूल व्हावा अशी आमची मागणी आहे. हे समजून घ्या कारण ११/०५/२०२२ आणि २५/०१/२०२२ रोजी आम्ही तुम्हाला निवेदन दिले. पण तुम्ही आमचे निवेदन घेतले नाही आम्ही नांदगाव नगरपालिकेत कर भरतो आम्ही ही मागणी केली आहे पण ती पूर्ण केलेली नाही. आमच्या कॉलनीतील योगेश गायकवाड ते गांगुर्डे यांच्या घरापर्यंतचे काम अजूनही अपूर्ण आहे.उद्या महिलेला डिलेव्हरीसाठी दवाखान्यात नेण्याची वेळ आली तर रस्ता नाही अशा काय करायचे असा प्रश्न येथील नागरिकांनी पडला आहे. असे निवेदनात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment