नांदगाव (प्रतिनिधी) - मनमाड–इंदोर रेल्वेमार्गाच्या प्रगतीपथावरील कामामुळे अस्तगाव ता. नांदगाव येथील शेतकरी बांधवांच्या शेती संसाधनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर, खासदार भास्करराव भगरे सर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या भेटीत शेतकऱ्यांच्या पाईपलाईनसह शेतीतील इतर विविध नुकसानीबाबत मुद्देसूद मांडणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या समस्या गांभीर्याने घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रत्यक्ष स्थळ पंचनाम्यानुसार एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच तातडीने योग्य ती कार्यवाही करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले. या सकारात्मक भूमिकेमुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, प्रशासनाकडून न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांच्यासह ज्ञानेश्वर दुकळे, मनोहर काजीकर, भास्कर उगले, सुभाष उगले, त्र्यंबक नागरे, अमोल उगले, दिलीप गेठे, कुणाल बोरसे आदी उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment